सेंद्रिय शेतीचे फायदे

.

शेतीसाठी पूर्वीपासून सेंद्रिय खतांचा वापर करून पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते. मात्र आधुनिक काळात अती लोकसंख्येमुळे उत्पादनाची वाढलेली मागणी, आधुनिक तंत्रज्ञानामुळे वाचणारा वेळ आणि रासायनिक खतांमुळे होणारे जास्त उत्पादन यामुळे सेंद्रिय पद्धतीने केली जाणारी शेती ही काळाच्या ओघात मागे पडत गेली. मात्र सध्या ग्राहक स्वतःच्या आरोग्य आणि सुरक्षेबाबत जागरुक झाले आहेत. त्यामुळे पुन्हा सेंद्रिय उत्पादनांचे महत्त्व सर्वांना पटू लागले आहे. ज्यामुळे आजकाल सेंद्रिय शेतीतून पिकवलेल्या धान्य आणि भाजीपाल्याला चांगली मागणी आणि उत्पन्न पुन्हा मिळू लागले आहे. सेंद्रिय शेतीचे फायदे  आणि या प्रकारच्या शेतीला का प्रोत्साहन दिले पाहिजे यासाठी ही सेंद्रिय शेतीची माहिती अवश्य वाचा.

कीटकनाशके आणि रसायनांचा वापर कमी

शेतीला कीड लागू नये आणि पिक मुबलक मिळावं यासाठी शेतावर रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा मारा केला जातो. मात्र त्यामुळे धान्याची गुणवत्ता आणि जमिनीची सुपिकता कमी होते. सेंद्रिय शेतीमध्ये मात्र रासायनिक खतांचा वापर न करता फक्त नैसर्गिक घटकांचा वापर केला जातो. सेंद्रिय शेती ही परंपरागत पद्धतीने केली जाणारी शेतीची एक पद्धत आहे. ज्यामध्ये धान्यावर मारल्या जाणाऱ्या खतांसाठी पिकांचे टाकाऊ भाग, गोमूत्र, शेण अशा नैसर्गिक गोष्टींचा वापर केला जातो. यासाठी वापरण्यात येणाऱ्या बियाणांवरही रासायनिक प्रक्रिया केली जात नाही. ज्यामुळे पिकांची गुणवत्ता राखली जाते.

जमिनीची सुपिकता राखली जाते

चांगल्या गुणवत्तेचे धान्य हवे असेल तर जमिन तितकीच सुपीक असणे आवश्यक आहे. कीटकनाशके आणि रसायनांच्या अती माऱ्यामुळे जमिनीची सुपिकता कमी होत जाते. हळू हळू अशा प्रकारे केलेल्या शेतीतून मिळणारे धान्य हे पोषक आणि चांगल्या दर्जाचे राहत नाही. यासाठी सेंद्रिय शेतीला सुरूवात करण्याआधी जमिन सुपिक करणं खूप गरजेचे आहे. अशा प्रकारे जमिनीचा सुपिकपणा वाढला तर कमी साधनसामुग्रीमध्ये आणि कमी पावसाच्या क्षेत्रातदेखील चांगली शेती करता येऊ शकते. यासाठीच जमिन कसताना रसायनांचा वापर कमी करून त्यासाठी गवत अथवा पिकांचे टाकाऊ अवशेष वापरात आणावे. सेंद्रिय आणि जैविक खतांमुळे जमिनीचा कस वाढत जातो.

जलसंधारण आणि जलसंवर्धनास मदत

जलसंवर्धनाचे महत्त्व नसल्यामुळे आजकाल पाण्याची नासाडी आणि प्रदूषण होताना आढळते. शेतीसाठी आणि घरासाठी पाण्याची बचत करण्यासाठी या काही सोप्या टिप्स नक्कीच फायदेशीर आहेत.  शेतकामासाठी वापरण्यात येणाऱ्या केमिकल्स आणि रसायनांच्या निर्मितीसाठी पाण्याचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. जर सर्वांनी अट्टाहासाने सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन दिले तर पर्यायाने पाण्याचे प्रदूषण ही कमी होऊ शकते. सेंद्रिय शेतीमुळे पाण्याचे प्रदूषण तर होणार नाहीच शिवाय जलसंवर्धनाचे महत्त्वही लोकांना पटू लागेल. सेंद्रिय शेती निसर्गनियमांनुसार आणि जीवसृष्टीला अनुरूप असल्यामुळे तिच्यामुळे पाण्याचे प्रदूषण कमी प्रमाणात होते.

प्राण्यांचे आरोग्य आणि कल्याणासाठी फायदेशीर

मानवाच्या निसर्गातील अती हस्तक्षेपामुळे प्राणी, पक्षी, कीटक, जलचर यांच्या जीवनावर वाईट परिणाम झालेला आहे. हा परिणाम रोखण्याचा आणि निसर्गचक्र पुन्हा सुरळीत करण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. कारण सेंद्रिय शेती फक्त माणसाच्या आरोग्यासाठीच नाही तर निसर्गातील प्रत्येक जीवजंतूच्या आरोग्यासाठी हितकारक आहे. सेंद्रिय शेतीवर माणसाप्रमाणेच अनेक जीवजंतू, प्राणी पक्षी पोसले जातात. निसर्गाचे चक्र सुरळीत सुरू राहण्याची ही एक सुंदर व्यवस्था आहे. सेंद्रिय शेतीतून या निसर्गचक्राचा आदर राखला जाऊ शकतो.

जैवविविधतेस प्रोत्साहन मिळते

आधीच सांगितल्याप्रमाणे शेतीवर जितके जीव पोसले जातील तितकी त्या शेतीची जमिन आणि पीक सुपीक असेल. थोडक्यात सेंद्रिय शेती नेहमीच जैवविविधतेला प्रोत्साहन देणारी असते. ज्यामुळे खराब वातावरण, आजार, कीड लागणे अशा समस्यांमधून शेतीचा बचाव होऊ शकतो. थोडक्यात जेवढी जैवविविधता राखली जाईल तितकं शेतीसाठी पूरक आणि पोषक वातावरण निर्माण होईल. माणसासाठी आणि विश्वासाठी ही एक हितकारक गोष्ट आहे.

सेंद्रिय धान्याची चव चांगली असते

जर तुम्ही नियमित अथवा लहाणपणापासून सेंद्रिय धान्य, भाज्यांचे सेवन करत असाल तर ही गोष्ट तुम्हाला नक्कीच पटेल की सेंद्रिय धान्याची चव ही अप्रतिम असते. रासायनिक खतांचा वापर करून तयार केलेल्या धान्यात जमिनीची सुपिकता नसल्यामुळे मुळीच चव नसते. सेद्रिय धान्याची केवळ चवच छान असते असं नाही तर त्यांच्यामध्ये अॅंटि ऑक्सिडंटही जास्त प्रमाणात असतात. अनेक संशोधनात असे आढळून आलेलं आहे की सेंद्रिय धान्य, कडधान्य, भाज्या अथवा फळं आरोग्यासाठी अतिशय उत्तम असतात.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar