‘काँग्रेसचा वैचारिक आतंकवाद’ या विषयावर ऑनलाईन विशेष संवाद !_*

.

 

*_’काँग्रेसचा वैचारिक आतंकवाद’ या विषयावर ऑनलाईन विशेष संवाद !_*

*सलमान खुर्शिद यांनी पुस्तकाद्वारे केलेला हिंदुत्वाचा अवमान हा ‘पॅन इस्लाम’च !* – श्री. सुरेश चव्हाणके, मुख्य संपादक, सुदर्शन वाहिनी

काँग्रेसचे नेते सलमान खुर्शिद यांनी त्यांच्या पुस्तकात हिंदुत्वाची तुलना आतंकवादाशी केली आहे. या तुलनेकडे राजकीय नाही, तर धार्मिक दृष्टीने पहायला हवे. हा केवळ काँग्रेसच्या विचारधारेपुरता मुद्दा नाही, तर तो एक ‘पॅन इस्लाम’चा अजेंडा आहे. (पॅन इस्लामवाद हे एक राजकीय आंदोलन जे इस्लामी राज्याचे समर्थन करते.) त्यामुळे पुस्तके, चित्रपट, कविता आदींच्या माध्यमातून केवळ ‘जिहादी चळवळ’ चालवण्याचा हा प्रकार आहे. हा काँग्रेसचा वैचारिक जिहादी आतंकवाद आहे. काँग्रेसची रणनीतीच हिंदुद्वेषावर आधारलेली आहे. मंदिरांमध्ये जाणे, नवरात्रीत उपवास करणे वगैरे कृती या निवडणुकीपुरत्या असतात, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे अशा आरोपांवर स्पष्टीकरण देण्यापेक्षा हिंदूंनी स्वत:चे ध्येय साध्य करण्याकडे लक्ष दिले पाहिजे, *असे प्रतिपादन ‘सुदर्शन वाहिनी’चे मुख्य संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांनी केले.* हिंदु जनजागृती समितीच्या वतीने *’काँग्रेसचा वैचारिक आतंकवाद’* या विषयावर आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होते.

काँग्रेसकडून होणार्‍या आक्षेपार्ह वक्तव्यांच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ऑनलाईन आंदोलन करण्यात आले. यामध्ये हातात फलक घेऊन काँग्रेसचा निषेध करण्यात आला. प्रशासनाला निवेदन देण्यात आले. या विषयावर हिंदूंनी एकत्र येऊन ट्विटरवर *#Congress_Hates_Hindutva* या नावाने चालवलेल्या टे्रंडला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात 20 हजारांहून अधिक ट्वीट करण्यात आले.

संवादामध्ये बोलतांना *ऑस्ट्रेलिया येथील कार्यकर्ते डॉ. यदु सिंह* म्हणाले की, हिंदु धर्मग्रंथांचा संदर्भ देऊन हिंदुत्व आणि हिंदु धर्म हे निराळे असल्याचे राहूल गांधी यांचे विधान केवळ हास्पास्पदच नाही, तर आपण काय बोलतो हे त्यांनाही कळलेले नाही. हिंदुत्वाची ‘बोको हराम’ आणि ‘आयसीस्’ या आतंकवादी संघटनांशी तुलना होऊच शकत नाही. अशा विधानांचे समर्थन केल्यामुळेच काँग्रेसचा पराभव होत आहे. ‘मारा, कापा आणि बाटवा’ हे शिकवणार्‍या अन्य धर्मियांच्या ग्रंथांविषयी बोलण्याचे धाडस राहूल गांधी का दाखवत नाही ?

या वेळी *’हिंदु जनजागृती समितीचे मध्य प्रदेश आणि राजस्थान राज्यांचे समन्वयक श्री. आनंद जाखोटिया* म्हणाले की, ‘डिसमेंटलींग ग्लोबल हिंदुत्व’ या अमेरिकेतील हिंदुविरोधी परिषदेतून आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदुत्वाला संपवण्याचे कारस्थान चालू झाले आहे. हाच अजेंडा काँग्रेसवाले चालवत आहेत. याआधी ‘भगवा आतंकवाद’ असल्याचा प्रचार काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम् आणि सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे. आतापर्यंत 2 लाख 93 हजार 900 लोक आतंकवादी आक्रमणांत मारले गेले आहेत. यामागे सर्व आतंकवादी हे जिहादी आहेत, मग हे सर्वजण काँग्रेसचे नेते रशीद आल्वी यांना मुनी वाटतात का ? त्याविषयी काँग्रेस का बोलत नाही ?, असा प्रश्‍नही त्यांनी या वेळी उपस्थित केला.

 

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar