लष्करातील सुनियोजित बंडखोरी आणि महाभयंकर दंगली पासून देश आणि पंजाब वाचला.

.

लष्करातील सुनियोजित बंडखोरी आणि महाभयंकर दंगली पासून देश आणि पंजाब वाचला.
मोदींनी कृषी कायदे रद्द केले, बरं झालं!
– लेखन,
भाऊ तोरसेकर

पंजाब : असंख्य मीडिया रिपोर्ट्सनी एकेकाळी देशातील सर्वात वेगाने वाढणारे राज्य असलेल्या पंजाबमध्ये ड्रग्सने घातलेल्या धुमाकुळाबद्दल माहिती दिली आहे. ड्रग्सच्या आहारी गेलेली तरुण पिढी हातात हत्यार उचलायला वेळ लावत नसते, हे जगभरात अनेक ठिकाणी पाहण्यात आले आहे. नेमकं, हेच पंजाब मध्ये सुरु होतं ! कॅप्टन अमरींदर सिंग काँग्रेसी असले तरी Army मध्ये “Captain” पदी उत्तम कामगिरी केली होती, म्हणजेच देशप्रेम त्यांच्या नसानसात भिनलेले दिसून येते. पंजाबमध्ये काय भायानक शिजत आहे हे सगळं त्यांना माहीत होते. गेल्या 4 महिन्यात (राजीनामा देण्याआधी पासून) त्यांच्या वाढलेल्या दिल्ली फेऱ्या, NSA डोवल यांच्याशी नियमित होत असलेला संपर्क आणि त्यांनी वेळोवेळी केंद्राला दिलेले ‘dossier’ हे पुढे येणाऱ्या महासंकटाकडे बोट दाखवत होते. पण पक्षाकडून होत असलेली अडवणूक त्यांना नीट काम करू देत नव्हती. केंद्राशी होत असलेला त्यांचा संपर्क काँग्रेस नेतृत्वाला पसंद नव्हता, आणि यातूनच त्यांची कालांतराने विकेटही गेली! अशात, काही लोकांकडून ड्रग्स आणि दहशतवादासोबत यावेळी एक वेगळ्याच ‘कॉक-टेल’ स्ट्रॅटेजीला पंजाबात राबवायच्या प्लॅनची सविस्तर माहिती अगदी त्याच्या ‘ब्लु-प्रिंट’ सकट अमरींदर सिंग यांनी जेंव्हा अमित शहाना दिली, तेंव्हा त्यांच्या पायखालची जमीनच सरकली! नंतरच्या काळात मोदी आणि अमरींदर सिंग यांची तब्बल 4 वेळा, अमित शहांसोबत 6 वेळा, डोवल आणि IB प्रमुख यांच्यासोबत अनेक वेळा औपचारिक व अनौपचारिक भेट झाली! ड्रग्स आणि दहशतवादा सोबत, कृषी कायद्याचे निमित्त साधून पुढील वर्षी पंजाबच्या निवडणूकांच्या आधी हिंदू-शिख दंगली घडवून पंजाब मधील 40% पंजाबी हिंदूंना संपवण्याचा आणि भारतीय लष्करातील सीख रेजिमेंट मध्ये बंडखोरी घडून, भारतीय सेनेत फूट पाडण्याचा खलिस्तानी आणि ISI चा तो मास्टर-प्लॅन होता!! या सर्व खेळाच्या मागे कृषी कायदे आणि ड्रग्स हे कारण वरकरणी दिसत असले तरी हा ड्रग्स पासून सुरू होऊन पॉलिटिक्स पर्यंत आलेला ‘नार्को-पॉलिटिक्स’ चा खेळ होता, यात माफियाच नाही तर त्यांना राजकीय पाठबळ देणारी एक जमात पण सक्रिय होती. तोवर ‘प्लॅनिंग’च्या स्टेजवर असलेल्या या मास्टर-प्लॅन मध्ये कॅप्टन अमरींदर सिंग यांना या संपूर्ण equation मधून हटवणे हे या मास्टर-प्लॅन ला कार्यान्वित करायची पहिली पायरी होती. हे झालं, तेंव्हाच पंजाब ज्या टाईम-बॉम्ब वर बसला होता, त्याला निकामी करण्यासाठी मोदींकडे खूप कमी वेळ आहे हे त्यांना स्वतःलाही माहीत होतं.

तरीही, मोदींनी एक प्रयत्न केला. अमित शहाची भेट घेऊन BSF चे कार्यक्षेत्र वाढवण्यास सांगितले, त्यातून पंजाबला वाचवता येईल असं त्यांना वाटलं. मुख्यमंत्री बदलला, आणि नवीन मुख्यमंत्र्याने BSF चे कार्यक्षेत्र वाढवू दिलं नाही! इकडे हे लक्षात घ्या : पंजाबचे क्षेत्रफळ आहे 50362 चौरस कमी. पंजाबला लागून आंतरराष्ट्रीय बॉर्डर आहे 553 किमी. 50 किलोमीटर कार्यक्षेत्र BSF ला दिले असते तर 27650 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ, अर्थात 55% पंजाब थेट अमित शहा यांच्या देखरेखीखाली आणता आला असता! जर ते शक्य झालं असतं, तरीही मोदींनी एकवेळ रिस्क घ्यायचा विचार 100% केला असता, आणि कृषी कायदे रद्द केले नसते.

मोदी सरकारचा BSF चे कार्यक्षेत्र वाढवायचा प्लॅन अपयशी ठरल्यावर दोन गोष्टी झाल्या. एक : मोदी सरकारकडे कोणतेही पर्याय शिल्लक राहिले नाहीत. दुसरा : पंजाब पेटवायचा प्लॅन असणाऱ्या लोकांना समजलं की त्यांचा डाव केंद्राच्या लक्षात आला आहे आणि त्यांना लवकरात लवकर काही तरी करावं लागणार आहे. म्हणूनच, कृषी आंदोलन चिघळवून त्याला ‘ट्रिगर’ म्हणून वापर करायची योजना आखण्यात आली! या आंदोलनाला ISI, खलिस्तानी, टुल-किटवाले, तुकडे तुकडे गँग, आंतरराष्ट्रीय मीडिया, काही राजकीय पक्ष आणि आपल्याच घरातील काही सापांचा पाठिंबा होता. पंजाबला 1980 च्या दशकातील पंजाब बनवण्यासाठी हे तयार बसले होते. फक्त दहशतवादच नाही, तर त्यात पंजाब मधील 40% हिंदू टार्गेट होणार म्हटल्यावर तर त्यांना कुठल्याही परिस्थितीत ही संधी वाया जाऊ द्यायची नव्हती. आज मोदींनी त्यांच्या मेहनतीवर आणि मनसुब्यांवर पाणी फेरलं आहे.

बाकी, आज ज्यांनी मोदींना नीट ऐकलं असेल त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली असेलच. मोदी आज बोलले : *”किसानों के लिए किया था, देश के लिए वापिस ले रहा हूँ !”*

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar