म्हापश्यातील स्थानिक लोकांनी तार नदीच्या पुढे बार्देश मधील मयडे नदीकडे जाणाऱ्या धोकादायक पाण्यात उगविणाऱ्या कमळाच्या पानामुळे व दाट शेवाळामुळे आतील जलचर प्राण्याच्या वाढीवबाद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे, ज्यामुळे नदीतील जलचरांना धोका निर्माण होऊ शकतो.
याबाबत असे दिसून येते की नदीचा एक मोठा भाग पाण्यातील कमळाच्या पानांच्या जाड थराने व शेवाळाने पूर्णपणे झाकलेला आहे ज्यामुळे नदीचे सौंदर्य बिघडले आहे.म्हापसा येथील तार नदी हे गणेशमूर्ती विसर्जनाचे प्रसिद्ध ठिकाण आहे आणि ते अनेक सागरी जीवांनी समृद्ध आहे आणि पाण्यातील कमळाच्या निर्मितीमुळे नदीतील जलचरांना गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. या ठिकाणी पाणी जास्त काळ एकाच ठिकाणी रहात असल्याने ही परिस्थिती झाली असावी असा अंदाज आहे.
येथील एक स्थानिक ग्रामस्थ व समाजकार्यकर्ता शेखर नाईक यांनी सांगितले की, पाणलोटांची जाड झाडे, जी जवळजवळ जंगलासारखी दिसते, त्यामुळे स्थानिकांना नदीत मासेमारी करणे कठीण झाले आहे कारण त्यांना त्यांची जाळी खराब होण्याची भीती आहे. कमळाच्या पानाच्या निर्मितीमुळे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मासे मरू शकतात.
येथील स्थानिक पंचायतीने, नगरपालिकेने किंवा संबंधित शासकीय यंत्रणेने याची दखल घेऊन या नदीतील समृद्ध सागरी जीव आणि माशांचे रक्षण करण्यासाठी या पाण्यातील कमळ्यांच्या पानांची लवकरात लवकर साफ सफाई करावी अशी मागणी नाईक यांनी पत्रकारांकडे बोलताना केले.
म्हापश्यातील स्थानिक लोकांनी तार नदीच्या पुढे बार्देश मधील मयडे नदीकडे जाणाऱ्या धोकादायक पाण्यात उगविणाऱ्या कमळाच्या पानामुळे व दाट शेवाळामुळे आतील जलचर प्राण्याच्या वाढीवबाद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे
![feturedimagee](https://aizgoanews.com/wp-content/uploads/2020/10/feturedimagee.jpg)
.
[ays_slider id=1]