हिंदु संस्कृतीचा सन्मान ठेवणार नसाल, तर बहिष्कारास्त्राचा वापर

.
भाटियाची नवीन जाहिरात प्रसारित !
हिंदु संस्कृतीचा सन्मान ठेवणार नसाल, तर बहिष्कारास्त्राचा वापर करू !
– हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांची चेतावनी

         ‘अक्षय तृतीया’ हा हिंदु सणांपैकी महत्त्वाचा सण आहेया दिवशी हिंदु परंपरेनुसार मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केली जातेमात्र या निमित्ताने ‘मलाबार गोल्ड अ‍ॅन्ड डायमंड’ने अक्षय्य तृतीयेच्या नावाखाली जणू ‘रमजान’चीच जाहिरात करत असल्याप्रमाणे अभिनेत्री करीना कपूर खान हिची कपाळावर कुंकू किंवा टिकली न लावता दागिन्यांची जाहिरात केलीयातून हेतूतः हिंदु समाजाच्या भावना दुखावण्याचाहिंदु संस्कृतीचे हनन करण्याचा प्रयत्न केलाहिंदु सणांच्या वेळीही जर हिंदूंच्या धार्मिक भावनांचासंस्कृतीचापरंपरांचा सन्मान ठेवला जात नसेलतर हिंदूंनीही या उत्पादनांवर बहिष्कार घालायला हवायाला विरोध करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने #No_Bindi_No_Business हा हॅशटॅग चालवत ट्वीटरवर अभियान छेडले आणि याला हिंदूंनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलादुसर्‍याच दिवशी ‘मलबार गोल्ड’ने बिंदी न लावलेल्या करिना कपूरखानच्या जागी बिंदी लावलेली तमन्ना भाटिया या अभिनेत्रीची नवीन जाहिरात प्रसारित केलीहा हिंदूंनी संघटितपणे केलेल्या विरोधाचा परिणाम आहेहिंदूंचा पैसा हवा आहेपण हिंदु संस्कृतीपरंपरा नकोहे चालणार नाहीहिंदुस्थानात व्यापार करायचा असेलतर हिंदु संस्कृतीचा सन्मान ठेवायलाच लागेलहिंदु संस्कृतीचा सन्मान राखला जाणार नसेलतर हिंदु समाज बहिष्कारास्त्राचा वापर करेलहे आस्थापनांनी लक्षात ठेवावेअशी चेतावनी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्रीरमेश शिंदे यांनी दिली आहे.

         या संदर्भात हिंदु जनजागृती समितीने ‘हिंदु सणांच्या वेळी हिंदुविरोधी प्रचार ?’ हा ऑनलाईन ‘विशेष संवाद’ आयोजित केला होतायामध्ये सहभागी इतिहास आणि संस्कृती अभ्यासक अधिवक्ता सतीश देशपांडे म्हणाले कीकाँग्रेसच्या राजवटीत डाव्या विचारसरणीच्या लोकांना राजाश्रय मिळाल्यामुळे त्यांनी विविध विद्यापिठे स्थापून हिंदुविरोधी विचारधारा समाजात रूजवली आहेत्याचाच परिणाम आहे कीआज टिकली वा कुंकू न लावलेले विज्ञापन प्रसारित होत आहेत्याला अभ्यासपूर्ण विरोध केला पाहिजेया वेळी कर्नाटकातील पत्रकार श्रीलक्ष्मी राजकुमार म्हणाल्या कीहिंदूंची ओळख पुसून टाकण्यासाठी चालू करण्यात आलेला हा ‘सांस्कृतिक जिहाद’ आहेआज आखाती देशांमध्ये तेथील महिला पत्रकार या हिजाब घालून बातमीपत्र देतातमग भारतात आपण कपाळावर कुंकू लावून केलेतर प्रतिगामी कसे काय होऊ शकतो आपल्या धार्मिक कृतींमागे असलेले विज्ञान हे हिंदूंपर्यंत पोचले पाहिजेया वेळी ‘सनातन संस्थे’चे धर्मप्रचारक श्रीअभय वर्तक म्हणाले कीकेवळ ‘मलाबार’वालेच नव्हेतर यापूर्वीही तनिष्कफॅब इंडियामिंत्राजावेद हबीबमान्यवर ब्रँड आदींनी हिंदुविरोधी आक्षेपार्ह विज्ञापने केली आहेतएकही विज्ञापन मुसलमान वा अन्य पंथीयांच्या विरोधात नाहीकारण ते धर्मासाठी संघटित आहेतत्यामुळे त्यांच्या विरोधात विज्ञापन करण्याचे कोणी धाडस करत नाहीहिंदूंनी स्वत:चा धर्म जपण्यासाठी अशा उत्पादनांवर बहिष्कार घालण्यासह कायदेशीर लढाई लढली पाहिजेयाविरोधात कठोर कायदा करण्याची मागणी केली पाहिजे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar