गोवा इन्क्विझिशन’ : एक काळाकुट्ट भयंकर इतिहास

.

*‘गोवा इन्क्विझिशन’ : एक काळाकुट्ट भयंकर इतिहास !*

गोव्यातील हजारो हिंदूंचे ख्रिस्ती पंथांत धर्मांतर करण्यासाठी ‘इन्क्विझिशन’च्या नावाखाली भीषण अत्याचार करणार्‍या ‘फ्रान्सिस झेवियर’ला ‘गोयंचो सायब’ ठरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे म्हणजे हिंदूंच्या जखमेवर मीठ चोळण्याचा भयंकर प्रकार आहे. गोवा ही परशुरामाची भूमी आहे, झेवियरची नाही, हेच सत्य आहे. त्यामुळे अशा झेवियरचे उदात्तिकरण समस्त हिंदु समाज कदापि सहन करणार नाही. आजही गोमंतकातील हिंदूंवर अनन्वित अत्याचारांचे प्रतिक असलेला ‘हात कातरो’ खांब हा ओल्ड गोवा चर्चजवळ स्थित आहे आणि तो हिंदूंवरील अत्याचारांची साक्ष देत तेथे उभा आहे. अनेक अत्याचारांची प्रतिके जरी वेळोवेळी नष्ट करण्यात आली, त्याचप्रमाणे ‘हात कातरो’ खांबही नष्ट करण्याचा डाव यापूर्वीच्या सरकारांनी केला होता. तो समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी उधळून लावला होता. आमचा धर्म, संस्कृती, समाजबांधवांना हालहाल करून मारणार्‍या झेवियरला ‘गोयंचो सायब’ म्हटलेले आम्ही मान्य करणार नाही. या अनुषंगाने झेवियरने केलेल्या अनन्वित अत्याचारांची माहिती देण्यासाठी हा लेखप्रपंच ! हा लेख वाचून तुम्हीच ठरवा, ‘झेवियर कोण होता ?’

वर्ष १५१० मध्ये पोर्तुगीज दर्यावर्दी आफोन्सो द अल्बुकर्क यांच्या नेतृत्वाखाली पोर्तुगिजांनी ‘सिटी ऑफ गोवा’ (तिसवाडी प्रांत) जिंकला. हळूहळू त्यांनी ‘सिटी ऑफ गोवा’ वरील पकड घट्ट केली. त्यानंतर ख्रिस्ती मिशनर्‍यांनी राजसत्तेचा वापर करत ख्रिस्ती धर्माचा प्रसार चालू केला. स्थानिक हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर करून त्यांना ख्रिस्ती पंथ स्वीकारण्यास भाग पाडले. वर्ष १५४० मध्ये धर्मांतर (बाटवणे) मोठ्या प्रमाणात चालू झाले. त्या वेळी पोर्तुगिजांकडे तिसवाडी हा एकच प्रांत होता. त्यानंतर १५४३ या वर्षी पोर्तुगिजांनी सासष्टी आणि बार्देश हे प्रांत कह्यात घेतले. हळूहळू सासष्टी आणि बार्देश या प्रांतांमध्येही ख्रिस्ती धर्मप्रसाराचे कार्य चालू झाले. स्थानिक हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर करून त्यांना ख्रिस्ती करण्यात आले.
स्थानिकांनी पोर्तुगिजांच्या जुलमी राजवटीच्या भीतीपोटी धर्मांतर करून ख्रिस्ती धर्म स्वीकारला. स्थानिक हिंदूंनी जरी ख्रिस्ती धर्म स्वीकारला, तरी त्यातील बरेच जण ख्रिस्ती धर्मानुसार आचरण करत नव्हते. ते पूर्वीच्याच हिंदु प्रथा-परंपरांप्रमाणेच आचरण करत. अशा ख्रिस्ती झालेल्या मात्र ख्रिस्ती पंर्थानुसार आचरण न करणार्‍यांना गुन्हेगार ठरवून कठोर शिक्षा करण्याच्या उद्देशाने गोव्यात ‘इन्क्विझिशन’ लागू झाले.

*‘फ्रान्सिस झेवियर’ याने केली होती ‘गोवा इन्क्विझिशन’ची मागणी*
फ्रान्सिस झेवियर या ख्रिस्ती धर्मगुरूने पोर्तुगालच्या राजांना पत्र लिहून गोव्यात ‘इन्क्विझिशन’ची मागणी केली होती. त्यानुसार १५६० या वर्षी गोव्यात ‘इन्क्विझिशन’ लागू करण्यात आले. गोव्यात ‘इन्क्विझिशन’ची जुलमी न्यायप्रणाली चालू झाली. ख्रिस्ती पंथाचे पालन न करणे, तसेच ख्रिस्ती पंथाच्या प्रसारामध्ये अडचणी निर्माण करणे इत्यादी आरोपांखाली स्थानिक हिंदूंना पकडून कारागृहात डांबले गेले. तेथे त्यांच्यावर अनन्वित अत्याचार चालू झाले. त्यांना गुन्ह्यांची स्वीकृती करण्यास बलपूर्वक भाग पाडले जाऊ लागले. नंतर त्यांना दोषी ठरवून विविध प्रकारच्या कठोर शिक्षा ठोठावण्यात येऊ लागल्या. काहींचे हात-पाय कापण्यात आले, काहींचे कान आणि जिभा छाटल्या गेल्या. काहींना मोठ्या चाकावर फिरवून त्यांच्या हाडांचा चुराडा करण्यात आला, तर काहींना जाळून ठार मारण्यात आले.

*‘इन्क्विझिशन’चे अधिकारी आणि ख्रिस्ती मिशनरी यांच्यांकडून हिंदूंचा छळ !*
गोव्यात ‘इन्क्विझिशन’ लागू केल्यानंतर स्थानिक हिंदूंचे जीवन नरक बनले. ख्रिस्ती मिशनरी स्थानिक हिंदूंवर हिंदु धर्माचा त्याग करून ख्रिस्ती पंथ स्वीकारण्यासाठी बळजोरी करू लागले. एखाद्या हिंदु कुटुंबातील अल्पवयीन मुलांचे वडील वारल्यास ‘इन्क्विझिशन’च्या ख्रिस्ती अधिकार्‍यांकडून त्यांना अनाथ घोषित केले जाऊ लागले. अशा प्रकारे अनाथ घोषित केलेल्या हिंदु मुलांचे धर्मांतर करून त्यांना पाद्री बनवण्यासाठी चर्चकडे सुपुर्द केले गेले. गोव्यातील पोर्तुगीज प्रांतांमध्ये मूर्तीपूजेवर बंदी घालण्यात आली. हिंदु धर्माचे खासगीत पालन करत असल्याचा आरोप करून असंख्य नवख्रिस्त्यांचा (बळजोरीने धर्मांतर करण्यात आलेल्या हिंदूंचा) छळ करण्यात आला. त्यांना कह्यात घेऊन ‘इन्क्विझिशन’साठी बनवण्यात आलेल्या कारागृहात डांबले गेले. तेथे त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करून गुन्ह्याची स्वीकृती करण्यासाठी दबाव आणला गेला आणि त्यांना ख्रिस्तेतर धर्माचे पालन केल्याविषयी दोषी ठरवले गेले. दोषी ठरवलेल्यांना सार्वजनिक ठिकाणी फटके मारणे, ‘हात कातरो’ खांब्यावर चढवून हात कापणे, वधस्तंभावर जाळणे आणि रक्तपिपासू मिशनर्‍यांकडून नखे आणि डोळे चिरडणे यांसारख्या भयंकर शिक्षा देण्यात आल्या. अनेक स्त्रिया आणि मुले यांना गुलाम बनवून संपूर्ण गावेच्या गावे जाळण्यात आली.
हिंदु धर्माचे पालन केल्याविषयी दोषी ठरवून त्यांना चाकाला बांधले जायचे आणि ते चाक फिरवले जायचे. त्यामुळे निष्पापांच्या हाडांचा चुराडा केला जायचा. कधी कधी हिंदु पालकांच्या ताब्यातून त्यांच्या मुलांना हे अधिकारी घेऊन जायचे आणि तरीही ख्रिस्ती पंथ स्वीकारला नाही, तर त्यांच्या समक्ष त्यांच्या मुलांना जाळून मारायचे. हजारो निष्पाप हिंदूंना धर्मांतरानंतर ख्रिस्ती पंथाचे पालन न केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवून हात कापण्यापासून ते जाळून मारण्यापर्यंतच्या कठोर शिक्षा ठोठावण्यात आल्या.

*‘गोवा इन्क्विझिशन’चा क्रूर इतिहास जगापासून लपवणारे पोर्तुगीज राज्यकर्ते !*
‘इन्क्विझिशन’चे संपूर्ण कार्य गुप्त पद्धतीने चालायचे. ‘इन्क्विझिशन’च्या कैद्यांचा बाहेरच्या जगाशी असलेला संबंध पूर्णपणे तुटायचा. बाहेरच्या जगाला, कुटुंबियांना कैद्यांविषयी माहिती मिळण्याचा कुठलाच मार्ग नव्हता. एका कैद्याला दुसर्‍या कैद्याचे दर्शनही घडत नव्हते. एका खोलीत एकाच कैद्याला ठेवले जायचे. त्यामुळे एका कैद्याचा छळ दुसर्‍या कैद्याला कळत नव्हता. ‘इन्क्विझिशन’चा क्रूर इतिहास जगासमोर येऊ नये, यासाठी त्या काळच्या पोर्तुगीज राज्यकर्त्यांनी ‘इन्क्विझिशन’शी सर्व कागदपत्रे जाळून टाकली असावी, असे काही इतिहासकारांचे मत आहे.

मंदिरे तोडून चर्चची उभारणी !
‘इन्क्विझिशन’चे अधिकारी आणि ख्रिस्ती मिशनरी यांनी वर्ष १५६६ पर्यंत तिसवाडी (गोवा बेट) प्रांतातील हिंदूंचे बळजोरीने धर्मांतर घडवून आणले. हिंदूंची शेकडो मंदिरे उद्ध्वस्त केली. वर्ष १५६६ ते १५६७ या कालावधीत ख्रिस्ती मिशनर्‍यांनी ख्रिस्ती पंथाच्या प्रसाराची मोहीम बार्देश आणि सासष्टी प्रांतांकडे वळवली. सासष्टीतील स्थानिक हिंदूंना याविषयीची चाहूल लागताच काहींनी त्यांच्या देवतांसह अंत्रुज महाल (फोंडा प्रांत) येथे पलायन केले, तर काहींनी कर्नाटक गाठले. यामध्ये कुठ्ठाळी येथील श्री मंगेश, केळशी येथील श्री शांतादुर्गा, वेर्णा येथील श्री महालसा, राय येथील श्री कामाक्षी, लोटली येथील श्री रामनाथ आणि इतर अनेक देवतांचा समावेश होता. या कालावधीत ख्रिस्ती मिशनर्‍यांनी सासष्टी प्रांतातील सुमारे ३०० हिंदूंची मंदिरे नष्ट केली. या उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांच्या जागेवर चर्च उभारण्यात आली. मंदिरांची भूमी चर्चकडे सुपुर्द करण्यात आली. जे कुणी ख्रिस्ती पंथ स्वीकारण्यास सिद्ध होत नव्हते, त्यांच्या भूमी आणि घरे बलपूर्वक ताब्यात घेतली गेली आणि त्यांना गाव सोडून जाण्यास भाग पाडले. बार्देश प्रांतामध्येही ख्रिस्ती मिशनर्‍यांनी हिंदूंवर अनन्वित अत्याचार करून त्यांचे बलपूर्वक धर्मांतर घडवून आणले.

*‘इन्क्विझिशन’मुळे हिंदु धर्म आणि संस्कृती यांची हानी !*
पोर्तुगिजांनी केवळ वसाहतवादावर समाधान मानले नाही. त्यांनी धर्मांतर आणि ‘इन्क्विझिशन’ यांच्या माध्यमातून गोव्यातील स्थानिक हिंदूंचा आणि संस्कृती नामशेष केली. गोव्यात कोकणी, मराठी, संस्कृत आणि अरबी भाषांतील पुस्तकांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली. कोकणी भाषेच्या वापरावर बंदी घालण्यात आली.

*इतिहासातून काय बोध घेणार ?*
स्वातंत्र्यानंतर भारतात स्थापन झालेल्या धर्मनिरपेक्ष राजवटींनी पोर्तुगिजांचा हा काळाकुट्ट इतिहास झाकण्याचा प्रयत्न केला. इतिहास कितीही झाकण्याचा प्रयत्न केला, तरी तो कालांतराने का होईना, उजेडात येतोच. इतिहास अभ्यासणे खूप महत्त्वाचे आहे. आज पुन्हा या घटनांची चर्चा का करता, असे काही जण निश्चितच म्हणतील किंवा या विषयाला वाचा फोडणार्‍यांवर टीकाही करतील, पण ‘जो इतिहास विसरतो, त्याचे भविष्य अंधःकारमय होते’ ! आज भारतातील अनेक भागांमध्ये ‘इन्क्विझिशन’ होत नसले, तरी हिंदूंचे धर्मांतर ही मोठी ज्वलंत समस्या अद्यापही आहे ! याविषयी जागृती करणे आणि ही होत असलेली धर्मांतरे रोखणे ही काळाची गरज आहे. आपल्या पूर्वजांनी लढा दिला, म्हणून गोवा मुक्त झाला. अन्यथा ‘धर्मांतर हे राष्ट्रांतरच’ याचा प्रत्यय आपल्याला ईशान्य भारतातील राज्यांच्या स्थितीवरून घेता येईलच. गोमंतक भूमी ही परशुराम भूमी आहे, तर त्या परशुरामाचा आदर्श घेऊन आपण आपले जीवन जगूया. आपली भाषा, संस्कृती, परंपरा, धर्म यांचे पालन आणि रक्षण करूया. आपल्या पूर्वजांनी अर्थात आपले संत, राष्ट्रपुरुष, धर्मपुरुष यांनी दिलेल्या आदर्श शिकवणीतून आदर्

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar