म्हापसा वाताहार
भारताचे माजी उपप्रधानमंत्रि कै. बाबू जगजीवनराम राम यांची ३६ वी पुण्यतिथी समाजोन्नती संघटनेतर्फे
पाळण्यात आली.
![](http://aizgoanews.com/wp-content/uploads/2022/07/IMG-20220707-WA0018-300x225.jpg)
साळगाव येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला जेष्ठ दलित कार्यकतै तथा समाजोन्नती संघटनेचे बादैश तालुका शाखेचे उपाध्यक्ष बाबू उफै विष्ण बांदेकर यांच्या हस्ते बाबूजीचा प्रतिमेस हार अपर्ण करण्यात आला. संघटनेचे मध्यवर्ती समितीचे उपाध्यक्ष दामोदर कुडाळकर व पत्रकार कमलाकर हूमरसकर व गंगा केरकर आदींनी सम ई प्रज्वलित करून तसबीरीस फुले वाहिली
दामोदर कुडाळकर यांनी प्रास्ताविक केले संघटनेच्या मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष शंभू भाऊ बांदेकर यांनी बाबुजी च्या जीवनकार्याचा आढावा घेतला. बाबूजी बिहार चांदवा खेड्यात एका गरीब शेतकरी चर्मकार समाजात जन्मून मोठ्या कष्टाने त्यांनी शिक्षण घेतले गांधी च्या आदेशानुसार त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली. समाजाचे हित व देशभक्ती हि दोन उदिष्टये समोर घेऊन ते तब्बल साठ वर्षे समाजकारण व राजकारणात सक्रिय राहिले. दीनदलित शोषित पिडीत समाजाच्या सवागिण उन्नतीसाठी ते शेवट पर्यंत कार्यरत राहिले. याप्रसंगी विष्ण बांदेकर, दामोदर कुडाळकर, व कमलाकर हूमरसकर यांनी बाबूजी च्या जीवन कार्याबद्दल आपले विचार मांडले. गंगा केरकर हीने आभार मानले.