हिंदु सुरक्षित, राष्ट्र सुरक्षित’ परिचर्चा उत्साहात संपन्न !* *अंतिम विजय हिंदूंचाच !* – अधिवक्ता विष्णु शंकर जैन

.

 

 

*‘हिंदु सुरक्षित, राष्ट्र सुरक्षित’ परिचर्चा उत्साहात संपन्न !*

*अंतिम विजय हिंदूंचाच !* – अधिवक्ता विष्णु शंकर जैन

*रायपूर (छत्तीसगढ)* – प्रभु श्रीरामचंद्र आणि सर्व देवी-देवता यांचे आशीर्वाद आपल्यासोबत असल्यामुळे हिंदूंना भयभीत होण्याची काहीच आवश्यकता नाही. प्रत्येक वेळी लढा देण्यासाठी शस्त्रच हाती घ्यायला हवे, असे नाही; तर कायदेशीर लढा दिला, तरीही आपण हिंदूंवर होणारा अन्याय दूर करू शकतो. हिंदु बहुसंख्य असोत किंवा अल्पसंख्य असोत, हिंदूंची बाजू सत्य आहे. म्हणून हिंदूंनी न्यायालयात कायदेशीर लढा दिला, तर निश्चितच अंतिम विजय हा हिंदूंचाच होणार आहे, *असे प्रतिपादन सर्वाेच्च न्यायालयातील अधिवक्ता विष्णू शंकर जैन यांनी केले. ते ‘हिंदु सुरक्षित, राष्ट्र सुरक्षित’ या परिचर्चेत बोलत होते.* ‘अखिल भारतीय हिंदु स्वाभिमान सेना’, ‘मिशन सनातन’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिचर्चा आयोजित करण्यात आली होती.

या वेळी प्रमुख वक्ते म्हणून शदानी दरबार तीर्थ येथील नवम पीठाधीश पू. डॉ. युधिष्ठीरलालजी महाराज, सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. अशोक पात्रीकर, सुदर्शन न्युज चॅनलचे मुख्य संपादक आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. सुरेश चव्हाणके, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगढ राज्य संघटक श्री. सुनील घनवट, अखिल भारतीय हिंदु स्वाभिमान सेनेचे संस्थापक श्री. अमित चिमनानी हे उपस्थित होते.

*अयोध्या तो एक झांकी है, हिन्दुओं के चार लाख मंदिर बाकी है !* – श्री. सुरेश चव्हाणके

या वेळी ‘सुदर्शन चॅनल’चे मुख्य संपादक सुरेश चव्हाणके म्हणाले की, ‘हिंदु म्हणजे काय ?’, ‘हिंदुत्व म्हणजे काय ?’, हे आपण समजून घेणे आवश्यक आहे. हिंदु संघटित झाल्यावर आणि हिंदु राष्ट्र आल्यावरच खर्‍या अर्थाने हिंदु सुरक्षित होतील. आज हिंदु महिला सुरक्षित नाहीत, हिंदु मुली सुरक्षित नाहीत, हिंदु परंपरा सुरक्षित नाहीत, हिंदु धर्म सुरक्षित नाही, यासाठीच आपल्याला हिंदु राष्ट्र स्थापन करणे आवश्यक आहे. हिंदूंवर होणार्‍या अन्यायाच्या विरोधात सुदर्शन चॅनल नेहमीच वाचा फोडत असते. छत्तीसगड मधील धर्मपरिवर्तन आणि गो-तस्करी या समस्या गंभीर आहेत. हे थांबवायचे असेल, तर राजकीय पक्ष म्हणून विचार न करता आपण सर्वांनी संघटित झाले पाहिजे. व्यक्ती कोणत्याही पक्षाचा असू द्या; परंतु त्याने धर्म, राष्ट्र व हिंदुत्व यांसाठी कार्यरत राहिले पाहिजे. अयोद्ध्येची श्रीरामजन्मभूमी आपल्याला मिळाली; परंतु ‘अयोध्या तो एक झांकी है, हिंदू के चार लाख मंदिर बाकी है !’

या वेळी *शदानी दरबारचे नवम पिठाधिश पू. युधिष्ठिर लालजी महाराज* यांनी हिंदु संघटनांनी एकत्र येऊन आयोजित केलेला हा कार्यक्रम कौतुकास्पद आहे, असे म्हणत हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. हिंदु असेच संघटित होत राहिले, तर हिंदु राष्ट्र येणे दूर नाही. संत समाज आणि शदानी दरबार या कार्यात कायम सोबत राहील, असेही महाराजांनी सर्वांना आश्वस्त केले.

या वेळी *सनातन संस्थेचे धर्मप्रचारक संत पू. अशोक पात्रीकर म्हणाले की,* हिंदूंच्या 33 कोटी देवतांचे विशिष्ट असे कार्य आहे. धर्मकार्य करण्यास त्या त्या देवतांचे आशीर्वाद मिळण्यासाठी सर्वांनी उपासना करणे आवश्यक आहे. हिंदु धर्मावर वाढत असलेली विविध जिहादी संकटे दूर करण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हाच एकमेव उपाय आहे.

*‘हलाल मुक्त दीपावली’ साजरी करण्याचा संकल्प करा !* – श्री. सुनील घनवट

आज ‘हलाल’ हा शब्द केवळ प्राण्यांच्या मांसापर्यंत सीमित न रहाता खाद्यपदार्थ, मॉल आणि ‘मॅकडोनाल्ड’ंसारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्या सुद्धा ‘हलाल सर्टिफिकेट’ घेत आहेत. ‘हलाल सर्टिफिकेट’ देणार्‍या संस्था आतंकवादी कारवायांसाठी अटक करण्यात आलेल्या आतंकवाद्यांना कायदेशीर साहाय्य करत आहेत. त्यामुळे आपण ‘हलाल प्रमाणित’ उत्पादनांवर बहिष्कार टाकायला हवा. यावर्षी आपण राज्यात ‘हलालमुक्त दिवाळी’ साजरी करण्याचा निश्चय करूया, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगढ राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी या वेळी केले. हिंदुत्वाचा कार्यक्रम म्हणजे केवळ राजकीय कार्यक्रम असेच सर्वांना वाटते; परंतु आज केवळ हिंदूंचा असा हिंदुत्वाचा कार्यक्रम होऊ शकतो, हे आज सिद्ध झाले. आता आपण ‘गढबो नवा छत्तीसगढ’ अशी घोषणा देण्यापेक्षा ‘गढबो हिंदु राष्ट्र छत्तीसगढ’ अशी उद्घोष करायला हवा, असेही श्री. घनवट म्हणाले.

या वेळी *अखिल भारतीय हिंदु स्वाभिमान सेनेचे संस्थापक श्री. अमित चिमनानी म्हणाले की,* अधिवक्ता विष्णू शंकर जैन आणि सुरेश चव्हाणके यांच्या पाठीशी सर्व समाज आणि पूर्ण छत्तीसगढ आहे. छत्तीसगढची भूमी ही ऐतिहासिक अशी आध्यात्मिक भूमी आहे. स्वामी विवेकानंदांची कर्मभूमी आहे. माता कौशल्याची जन्मस्थळी आहे. या भूमीतून अनेकांमध्ये शौर्य निर्माण होते. ‘गर्व से कहो हम हिंदू है !’ असे म्हणत भगव्याची ताकद आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. हिंदु कुठेही अडचणीमध्ये असला, तर त्याला आपण मदत केली पाहिजे. आपण सर्वांनी संघटितपणे कार्य केले पाहिजे.

या परिचर्चेचा उद्देश श्री. मदन मोहन उपाध्याय यांनी स्पष्ट केला, तर श्री. मदन मोहन उपाध्याय आणि हिंदु जनजागृती समितीच्या सौ. अनुभूती टवलारे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कु. अरायाना चिमनानी आणि कु. वैष्णवी उपाध्याय या दोन लहान रणरागिणींनी गीत आणि कविता यांच्या माध्यमातून हिंदु धर्मरक्षणार्थ कार्यरत होण्यासाठी हिंदु समाजाला आवाहन केले. या वेळी वक्त्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला, तसेच कृतीशील हिंदुत्वनिष्ठ पदाधिकार्‍यांचाही सत्कार श्री. सुरेश चव्हाणके यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमात अखिल भारतीय हिंदू स्वाभिमान सेना, मिशन सनातन, हिंदु जनजागृती समिती, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, शदानी दरबार, सनातन संस्था आदी विविध संघटनांचे 800 हून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.

आपला नम्र,
*श्री. रमेश शिंदे,*
राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती.
(संपर्क : 99879 66666)

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar