पुस्तके मानवी जीवनात मोलाचे परिवर्तन घडवू शकतात. चांगल्या पुस्तकाचा वाचनातून प्रेरणा घेऊन काही मंडळी अजोड कीर्ती मिळवू शकली आहेत असे उदगार प्रा. दिलीप बेतकेकर यांनी कांदोळी येथील स्वामी समर्थ मठात पालक व विद्याथीसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना केले.
![](http://aizgoanews.com/wp-content/uploads/2023/04/IMG-20230413-WA0187-300x135.jpg)
आराडी कांदोळी येथील प्रगती वाचनालयात आयोजित केलेल्या या कार्यक्रमात प्रा. दिलीप बेतकेकर यांनी अण्णा हजारे यांनी स्वामी विवेकानंदांचे पुस्तक वाचल्यावर त्यांनी गावाच्या विकासासाठी कसे वाहून घेतले याचा वृतांत गोष्टी रूप शैलीत कथन केला.
ते पुढे म्हणाले की पुस्तक मस्तकाचे, बुद्धीचा, मनाचा विकास साधण्यास मदत करते, वाचनाचे महत्त्व कथन करुन त्यांनी उपस्थितांना वाचन विषयक मार्गदर्शन केले. प्रारंभी सम ई प्रज्वलित करून कार्यक्रमची सुरूवात करण्यात आली. स्वामी समर्थ मठाचे अध्यक्ष रघुनाथ पाटील आणि चेतना पेडणेकर यांनी फुल देऊन मान्यवरचे स्वागत केले . नारायण धारगळकर यांनी प्रास्ताविक व ओळख करून दिली . यावेळी संकृती संवर्धन प्रतिष्ठान चे ( मुंबई) विश्वत मोहन सालेकर, भारत बेतकेकर, संजय शिरगावकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता झाल्यावर बेतकेकर यांनी प्रगती वाचनालयात जाऊन पुस्तक प्रदशनाचे निरीक्षण केले.
) कांदोळी येथे स्वामी समर्थ मठात उदघाटन करताना दिलीप बेतकेकर, मोहन सालेकर व इतर