कॉन्व्हेंट शाळांऐवजी चांगल्या संस्काराचे शिक्षण देणारी विद्यालये निवडा ! – गौरी द्विवेदी,

.
कॉन्व्हेंट शाळांऐवजी चांगल्या संस्काराचे शिक्षण देणारी विद्यालये निवडा !
– गौरी द्विवेदी, मुख्याध्यापिका, रुद्रप्रयाग विद्यामंदिर

      कॉन्व्हेंट शाळांमध्ये विशिष्ट अटी ठेवून शिक्षण दिले जातेमात्र कॉन्व्हेंट शाळांमध्ये शिक्षण घेणारी बहुतांश मुले ही हिंदू असतातकॉन्व्हेंट शाळांमध्ये बहुतांश विद्यार्थी हे हिंदू असल्याने हिंदु संस्कृतीचा अंतर्भाव असलेले शिक्षण देण्याची ही व्यवस्था हवी आणि यामध्ये भेदभाव झाल्यास हिंदू मुलांच्या पालकांच्या समूहाने त्या शाळेच्या प्रशासनाला जाब विचारला पाहिजेकॉन्व्हेंट शाळांमध्ये शिकलेले विद्यार्थी हिंदु संस्कृतीपासून दूर जात आहेत. ‘इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकलेला विद्यार्थीच यशस्वी होईल’या गैरसमजातून पालकांनी आता बाहेर आले पाहिजे. ‘विद्यार्थी संस्कारी झाल्यावरच यशस्वी होईल’हे लक्षात घेतले पाहिजेआधुनिक शिक्षण देण्याबरोबरच संस्काराचे शिक्षण देणारी विद्यालये आपल्या मुलांसाठी निवडाअसे आवाहन प्रयागराज (उत्तर प्रदेशयेथील ‘रुद्रप्रयाग विद्यामंदिरा’च्या मुख्याध्यापिका गौरी द्विवेदी यांनी केलेत्या हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘कॉन्व्हेंट शाळांचा विरोध टिकलीला कि हिंदु धर्माला?’ या विषयावर आयोजित विशेष संवादात बोलत होत्या.

कॉन्व्हेंट शाळांचा ‘अल्पसंख्याक’ हा दर्जा काढा !

 

     या वेळी हिंदु जनजागृती समितीचे पुणे येथील समन्वयक श्रीनागेश जोशी म्हणाले कीझारखंड येथील कॉन्व्हेंट शाळेत कपाळावर टिकली लावली म्हणून शिक्षिकेने थोबाडीत मारलीया अपमानामुळे उषा कुमारी या हिंदू विद्यार्थीनीने आत्महत्या केलीहे छळाचे पहिले उदाहरण नसून यापूर्वी देशभरात ठिकठिकाणी कॉन्व्हेंट शाळांमध्ये हिंदू विद्यार्थ्यांसोबत असे प्रकार घडले आहेतभारत स्वतंत्र झाल्यावर हिंदू विद्यार्थ्यांना शाळांमधून आपल्या हिंदु धर्माचे शिक्षण देणे आरंभ करायला हवे होतेमात्र असे झाले नाहीआज अनेक कॉन्व्हेंट शाळांमधून केवळ ख्रिस्ती पंथाचे शिक्षण दिले जातेहिंदु धर्मावर टीका केली जातेया कॉन्व्हेंट शाळांमधून हिंदू विद्यार्थ्यांचा धर्मांतराचा प्रयत्न केला जात असून कॉन्व्हेंट शाळा ही हिंदूंच्या धर्मांतराची केंद्रे होत आहेतबहुतांश कॉन्व्हेंट शाळांमध्ये 50 टक्क्यांहून अधिक हिंदू विद्यार्थी शिकतातत्यामुळे कॉन्व्हेंट शाळांचा ‘अल्पसंख्याक दर्जा’ सरकारने काढून घेतला पाहिजे.
धोरीझारखंड येथील ‘कस्तुरबा विद्यानिकेतन’च्या संयुक्त अध्यक्ष डॉपूजा म्हणाल्या कीकॉन्व्हेंट शाळांमध्ये शिकलेले विद्यार्थी विदेशी संस्कृतीचे अनुकरण करतातकॉन्व्हेंट शाळांमध्ये शिकणारी मुले निराशेला बळी पडत आहेतअसे आढळून आले आहेकॉन्व्हेंट शाळांमध्ये जाणारी मुले आपली भारतीय संस्कृती विसरतातयाउलट सनातन हिंदु धर्माचे शिक्षण आणि आचरण केलेली मुले आत्मबळाने युक्त असतातअशी मुले निराशेची शिकार होत नाहीतहे लक्षात घेतले पाहिजेकॉन्व्हेंट व्यतिरिक्त अनेक शाळांमध्ये इंग्रजी भाषा चांगल्या प्रकारे शिकवली जातेआमच्या देशभरातील विद्याभारती शाळांमध्ये हा प्रयत्न सुरू आहे.

आपला नम्र,
श्री. रमेश शिंदे,
राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती,
(संपर्क : 99879 66666)

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें