गेल्या काही दिवसांपासून काही राजकारण्यांकडून सनातन धर्मावर अश्लाघ्य टीका

.
 म्हापसा वाताहार 
 गेल्या काही दिवसांपासून काही राजकारण्यांकडून सनातन धर्मावर अश्लाघ्य टीका होत आहेतामिळनाडूमधील द्रमुक पक्षाचे क्रीडामंत्री तथा मुख्यमंत्रीपुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी ‘सनातन धर्मविरोधी परिषदे’त ‘सनातन धर्म डेंग्यूमलेरिया यांसारखा असून त्याचे उच्चाटन व्हायला हवे’असे तारे तोडलेत्यानंतर द्रमुक पक्षाचे तामिळनाडूतील खासदार ए.केराजाकाँग्रेसचे कर्नाटकातील मंत्री प्रियांक खर्गेतृणमूल काँग्रेस पक्षाच्या ममता बॅनर्जीअभिनेते कलम हसनसिनेअभिनेता प्रकाश राज यांच्यासम महानुभवी मंडळींनी उदयनिधी यांची री ओढलीखरे तर हे ‘हेट स्पीच’ केल्याप्रीत्यर्थ उदयनिधी आणि तत्सम मंडळींना गजाआड करायला हवे होतेपण दुर्दैवाने अद्यापपर्यंत तरी त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाहीअर्थात सनातन धर्मात ‘कर्मसिद्धांत’ आहेत्यामुळे केलेल्या प्रत्येक कर्माचे फळ हे कधी ना कधीतरी भोगावेच लागणार आहे !

सनातन हे अविनाशी तत्त्व :
    ‘
सना आतनोति इति सनातनः ।’ अशी सनातन या शब्दाची व्युत्पत्ती आहेसना म्हणजे शाश्वत आणि आतनोति म्हणजे प्राप्ती करून देते. ‘सनातन’ म्हणजे शाश्वताची प्राप्ती करून देते ते. ‘सनातनो नित्यनूतन:’ म्हणजे जो शाश्वतअनादि असूनही नित्यनूतनम्हणजेच कधी जुनापुराणा होत नाहीत्याला ‘सनातन’ म्हणतातसनातन हे अविनाशी तत्त्व आहेमहाभारताच्या शांतीपर्वात अध्याय 64 मध्ये म्हटले आहे कीअनादि काळी ईश्वराने सृष्टीची उत्पत्ती केलीतेव्हाच धर्माचीही निर्मिती केलीअनादि आणि अनंत अशा धर्माला संपवण्याचा कितीही प्रयत्न केलातरी सनातन संपू शकत नाहीकारण उत्पत्तीस्थितीलय हा नियम धर्माला लागू होऊ शकत नाहीयुगानुयुगे सुर आणि असुर संग्राम चालू आहे आणि यात अंतिम विजय सत्याचा अर्थात् सनातन धर्माचा होतोहा इतिहास आहेहेच शाश्वत सत्य आहेत्यामुळे आगामी काळात सनातन धर्माचे उच्चाटन होईल कि सनातनविरोधी द्रमुकचेयाचे उत्तर काळच देईल.

हिंदुत्वाचा सूर्य ‘उदय’ होत आहे ! :
        
स्टॅलिन यांचे वक्तव्य येताच धर्मविद्वेशी पिलावळीने लागोपाठ हिंदु धर्माच्या विरोधात वक्तव्ये केलीकाही वर्षांपूर्वी ‘धर्म ही अफूची गोळी आहे’, ‘देवाला रिटायर्ड करा’ अशी वक्तव्ये करण्यात आली होतीही वक्तव्ये म्हणजे हिंदु धर्माच्या विरोधात चालणार्‍या ‘डिस्मेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राचा भाग आहेजी भाषा मोगल आक्रमकांची होतीतीच भाषा आज स्टॅलिन आणि ओवैसी यांची आहेसनातन हिंदु धर्माला विरोध करण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर होत असलेतरी आज कोरोनानंतर जगभरात हिंदु धर्माविषयी आकर्षण वाढत आहेसनातन जीवनशैली अंगिकारणार्‍यांचेही प्रमाण वाढत आहेज्याप्रमाणे सूर्योदयाची वेळ हळूहळू जवळ येतेतसतसे वातावरणातील अंधकार कमी होतोतसे हे आहेउदयनिधी वा एराजा यांनी कितीही थयथयाट केलातरी आज जागतिक स्तरावर हिंदुत्वाचे ‘डिसमेंटलिंग’ नाहीतर हिंदुत्वाचा सूर्य ‘उदय’ होत आहेहे वास्तव आहे.

नुकतीच भारतात ‘जी-20’ परिषदेची शिखर बैठक झालीत्या वेळी भारतात आलेले ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी सपत्नीक अक्षरधाम मंदिराला भेट दिली. ‘मी हिंदु आणि भारतीय वंशाचा असल्याचा मला अभिमान आहे’असे जाहीर वक्तव्य त्यांनी केलेया परिषदेला आमंत्रित अनेक विदेशी महिलांनी साडी हा पारंपारिक हिंदु पोशाख परिधान केला होताअमेरिकेच्या आगामी राष्ट्रध्यक्षापदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार असलेले भारतीय वंशाचे रामास्वामी यांनीही हिंदु धर्माविषयी आस्था प्रगट केली आहेहिंदु धर्ममूल्यांप्रमाणे ते त्यांचे दैनंदिन आचरण करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

     याच महिन्यात अमेरिकेतील लुईसव्हिले या शहराच्या महापौरांनी सप्टेंबर हा दिवस ‘सनातन धर्म दिवस’ म्हणून घोषित केलाविदेशातील लोक हिंदु धर्माचे अनुसरण करत आहेततसे भारतातील आस्तिकताही वाढत आहेवर्ष 2019-20 मध्ये भारतात केलेल्या संशोधनावर आधारित ‘प्यु रिसर्च सेंटर’चा जो अहवाल प्रसिद्ध झाला आहेत्यामध्ये असे आढळून आले आहे की, ‘80 टक्के हिंदू देवावर विश्वास ठेवतात. 55 टक्के हिंदु घरात नियमित पूजा करतात.’ योगआयुर्वेदसंस्कृत भाषा यांविषयीही जगभरात आकर्षण वाढत आहे.

तामिळनाडूतील मंदिरे सरकारमुक्त करा !
         
उदयनिधी स्वतःला ख्रिस्ती म्हणवतात आणि सनातन धर्माला नावे ठेवतातकदाचित हिंदु धर्माचा प्रभाव सर्वत्र वाढत असल्यानेच उदयनिधी यांची अस्वस्थता वाढत असेलसनातन धर्म समाजाचा प्रतिनिधी म्हणून उदयनिधिना एकच सांगावेसे वाटतेउदयनिनिधींना म्हणजेच तामिळनाडूमध्ये सत्ताधारी असलेल्या पक्षाला सनातन धर्म मान्य नसल्याने आता त्यांनी तेथील सनातन धर्माची आधारशीला असणार्‍या मंदिरांवरील हक्कही सोडायला हवात्यांनी तामिळनाडूमधील सर्व मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करण्याची घोषणा केली पाहिजे.

हेट स्पीच’वर कारवाई कोण करणार ? :
    आमच्या देशामध्ये दुर्दैवाने सनातन धर्माला नावे ठेवा की ‘सनातन धर्मियांचे उच्चाटन करा’ की सनातन धर्माच्या उच्चाटनासाठी ‘सर तन से जुदा’च्या खुलेआम घोषणा द्याकोणावरही ‘हेट स्पीच’च्या संदर्भात पोलीस कारवाई होत नाही किंवा न्यायालयाच्या सर्वोच्च संस्था सुओमोटो कारवाई करण्याचे धाडस दाखवत नाहीत. ‘सेक्युलॅरिझम’चा उपदेश देणार्‍या उदारतावाद्यांना एक प्रश्न आहे की,

    हिंदु धर्माविरोधात विखारी वक्तव्य करणार्‍यांमुळे भारतातील ‘सेक्युलॅरिझम’ धोक्यात कसा येत नाही ? ‘We the people’ … म्हणजे ‘आम्ही नागरिक’ भारतीय संविधानाचे मूळ प्राधान्य असताना अर्थात् बहुसंख्य हिंदू समाज हा सनातनी असतांनाभारताचे संविधान धोक्यात कसे नाही खरे तर उदयनिधी यांचे वक्तव्य म्हणजे एकप्रकारे सनातन धर्मीय हिंदूंचा वंशविच्छेद करण्यासाठी भडकवणारे वक्तव्य आहेपण उदयनिधीच्या या ‘हेट स्पीच’वर कारवाई कोण करणारहाच प्रश्न सनातनी समाजाच्या मनात आवासून उभा आहेराहिला प्रश्न सनातन धर्म उच्चाटनाचातर सनातन धर्म चिरंतन आहेअविनाशी आहे. ‘कावळ्याच्या शापाने गाय मरत नाहीत’तसे कोणाच्याही विद्वेषाने सनातन धर्म संपणार नाहीही आमची धर्मश्रद्धा आहे !

– श्रीचेतन राजहंसराष्ट्रीय प्रवक्तेसनातन संस्था.
संपर्क क्र.: (77758 58387),
Twitter @1chetanrajhans 
 

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें