साधना करून वास्तूदोषांचा हानीकारक प्रभाव कमी करा ! – राज कर्वे, ज्योतिष विशारद आणि वास्तूशास्त्र अभ्यासक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय 

.
साधना करून वास्तूदोषांचा हानीकारक प्रभाव कमी करा ! – राज कर्वे, ज्योतिष विशारद आणि वास्तूशास्त्र अभ्यासक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय

      ‘ज्याप्रमाणे वास्तूचा परिणाम व्यक्तीवर होतोत्याचप्रमाणे व्यक्तीचाही परिणाम वास्तूवर होत असतोसाधना करणार्‍या व्यक्तीचा सकारात्मक परिणाम वास्तूवर होऊन वास्तूदोषांचा हानीकारक प्रभाव न्यून होतो’असे प्रतिपादन ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चे ज्योतिष विशारद आणि वास्तूशास्त्र अभ्यासक श्रीराज कर्वे यांनी केले. नुकतेच आगरतळात्रिपुरा येथे झालेल्या ‘नॅशनल सेमिनार ऑन कन्ट्रिब्यूशन ऑफ वास्तूशास्त्र इन मॉडर्न कन्टेक्स्ट’ या परिषदेत श्रीराज कर्वे बोलत होतेत्यांनी ‘वास्तूशास्त्रानुसार वास्तूनिर्मिती करण्याचे लाभतसेच वास्तूदोषांच्या निवारणासाठी सुलभ आध्यात्मिक उपायांच्या जोडीला ‘साधना करण्याचे महत्त्व !’ हा शोधनिबंध सादर केलाज्याचे मार्गदर्शक सच्चिदानंद परब्रह्म डॉआठवले हे असून लेखक श्रीकर्वे हे आहेत.

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने ऑक्टोबर 2016 ते नोव्हेंबर 2023 या कालावधीत 18 राष्ट्रीय आणि 93 आंतरराष्ट्रीयअशा एकूण 111 वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेतयांपैकी 13 आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये ‘सर्वाेत्कृष्ट सादरीकरण’ पुरस्कार मिळाले आहेत.

श्रीराज कर्वे यांनी सांगितले की, वास्तूशास्त्रानुसार घराचे प्रवेशद्वार योग्य पदात (जागेतअसल्यास घरात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होतेयाउलट प्रवेशद्वार निषिद्ध पदात असल्यास घरात नकारात्मक ऊर्जा प्रवाहित होतेहे वैज्ञानिक उपकरण वापरून केलेल्या प्रयोगातूनही दिसून आलेथोडक्यात वास्तूशास्त्रानुसार घर बांधल्याने घरात सकारात्मक स्पंदने निर्माण होऊन व्यक्तीला सुख आणि शांती प्राप्त होते.

श्रीराज कर्वे यांनी पुढे सांगितले कीवास्तूशास्त्रानुसार घर बांधल्याने घरात सकारात्मक स्पंदने निर्माण झालीतरी ती टिकून रहाणे हे घरात रहाणार्‍या व्यक्तींच्या आचरणावर अवलंबून आहेव्यक्तीमध्ये स्वभावदोष आणि अहं यांचे प्रामण अधिक असल्यास तिच्याकडून अयोग्य आचरण होऊन वास्तूत नकारात्मक स्पंदने निर्माण होतातयाउलट व्यक्तीत चांगले गुण अधिक असल्यास तिच्याकडून योग्य आचरण होऊन वास्तूत सकारात्मक स्पंदने निर्माण होतातसाधनेमुळे व्यक्तीतील स्वभावदोष आणि अहं न्यून होऊन सद्गुण वाढताततसेच व्यक्तीतील रज आणि तम हे गुण न्यून होऊन तिच्यात सत्त्वगुण वाढतोयाचा शुभ परिणाम वास्तूवर होऊन ती सकारात्मक (सात्त्विकबनतेयाचे उत्तम उदाहरण म्हणजे संतांची वास्तू संत साधनारत असल्याने ते ज्या वास्तूत निवास करतातती वास्तू सात्त्विक होतेत्यामुळे संतांचे जन्मस्थाननिवासस्थानत्यांनी वापरलेल्या वस्तू इत्यादी जतन करण्याची परंपरा भारतात आहेयाबाबत संशोधनही मांडण्यात आले.’

आपला नम्र,
 
श्री. आशिष सावंत,
संशोधन विभाग, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय.
(संपर्क : 9561574972)

————
Photo Caption !

1. Raj Karve.jpg : श्री. राज कर्वे, ज्योतिष विशारद आणि वास्तूशास्त्र अभ्यासक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar