म्हापसा वाताहार
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वारसा स्थळावर विजयदुर्गा देवस्थान परिसरात आक्रमण आणि अतिक्रमण अशा दोन्ही आघाड्यांवर लढाईला उत आला आहे. आता येथे शव आणून प्रार्थना करण्याचे प्रकार सुरू झाले असून असे पुर्णपणे निषेधार्ह आहे, असे आंतराष्ट्रीय बजरंग दल गोवाचे प्रमुख नितिन फळदेसाई यांनी यांनी सांगितले.
याविषया आर्कीलोजिकल विभागाकडे अनेक तक्रारी गेला असल्या तरी त्याची दखल कोण घेताना दिसत नाही. आता लोकसभा निवडणूकीचे निमित्त सांगून अधिकारी कानाडोळा करत राहतील. इकडे बाकीचे सर्व गैरव्यवहार राजरोसपणे सुरू आहेत, ते रोखायची जबाबदारी सरकारची नाही काय? असा सवालही फळदेसाई यांनी विचारला आहे.
वारंवार विविध घटनांचे पुरावे सादर करून कारवाई होत नाही, सरकारचे मंत्री निवडणूकीच्या धामधुमीत व्यस्त आहेत. आम्ही न्याय कोणाकडे मागायचा, हे कोणी सांगेल का, असे वेदनादायी प्रश्न फळदेसाई यांनी सरकारला विचारला आहे.