*HDFC बँक ‘परिवर्तन’च्या ग्रामीण विकास उपक्रमांतर्गत 298 सीमावर्ती गावांना सामावून घेण्यात आले*
India 2025: HDFC बँक या भारतातील सर्वात मोठ्या खाजगी क्षेत्रातील बँकेने आपल्या CSR शाखा ‘परिवर्तन’ अंतर्गत ग्रामीण विकास उपक्रमांतर्गत देशभरातील 298 सीमावर्ती गावांना सामावून घेतले आहे. हे गावांचे समूह आसाम, अरुणाचल प्रदेश, बिहार, गुजरात, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, लडाख, राजस्थान, सिक्कीम, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांच्या सीमावर्ती भागात वसलेली आहेत. येत्या काही वर्षांत अशा आणखी 150 सीमावर्ती गावांपर्यंत आपली पोहोच वाढविण्याची बँकेची योजना आहे. हे उपक्रम सीमा क्षेत्र विकास कार्यक्रम आणि व्हायब्रंट व्हिलेजिस प्रोग्राममध्ये नमूद केलेल्या राष्ट्रीय विकास ध्येयांशी सुसंगत आहेत.
हिमालयाच्या उत्तर आणि ईशान्य दिशेकडील आणि देशाच्या पश्चिमेस वाळवंटी प्रांतांच्या सीमेवर वसलेल्या गावांना बऱ्याचदा खडतर भूभाग, आवश्यक सेवांपर्यंत मर्यादित पोहोच आणि त्यांच्या दुर्गम जागांमुळे आर्थिक असुरक्षितता यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. या प्रदेशात गरजेनुसार कार्य करून ‘परिवर्तन’ने येथील सुमारे पाच लाख लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम केला आहे.