मडगावमध्ये मुलांसाठी क्रोध नियंत्रण कार्यशाळा आयोजि

.

 

मडगावमध्ये मुलांसाठी क्रोध नियंत्रण कार्यशाळा आयोजित

मडगाव : मडगावचे काँग्रेस नेते चिराग नाईक यांनी क्रोध, चिंता आणि अहंकार यांवर नियंत्रण ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. रविवारी मडगावमध्ये झालेल्या क्रोध नियंत्रण कार्यशाळेत ते मुलांना संबोधित करत होते. ही कार्यशाळा अनिशा कापडी यांनी ‘चिराग दत्ता नाईक इनिशिएटिव्ह’ च्या सहकार्याने ७ ते १४ वयोगटातील मुलांसाठी आयोजित केली होती.
राग, चिंता आणि अहंकार यांच्यावर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे आहे, असे नाईक म्हणाले. तसेच त्यांनी अनिशा कापडी यांना अशा आणखी कार्यशाळा घेण्याचे आवाहन केले.
दोन तास चाललेल्या या कार्यशाळेत मुलांना राग ओळखण्याचे आणि त्यावर आरोग्यदायी पद्धतीने नियंत्रण मिळवण्याचे शिक्षण देण्यात आले. नाईक यांनी कार्यशाळा यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल अनिशा कापडी यांचे अभिनंदन केले.
या प्रसंगी बोलताना अनिशा कापडी म्हणाल्या, राग येणे ही एक नैसर्गिक भावना आहे. तो आरोग्यदायी पद्धतीने व्यक्त केला गेला पाहिजे, अन्यथा तो व्यक्तीला आतून पोखरत राहतो. आमच्या कार्यशाळेत मुलांना राग आल्यावर स्वतःला किंवा इतरांना दुखवू न देता तो हाताळण्याचे तंत्र शिकवले. मुलांना शांत राहण्यासाठी आणि रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी आम्ही पाच व्यावहारिक कौशल्ये – विश्रांती, लक्ष विचलन, हालचाल, बंधमुक्तता, संवाद व विचारशक्ती शिकवली, असेही त्यांनी सांगितले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें